अकोले शहरालगत प्रवरा नदीच्या काठावर अगस्ति ऋषींचे भव्य मंदिर आहे. या परिसराला अगस्ति आश्रम म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काळात या मंदिरच्या ब-याच भागाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तथापि जुन्या पाऊलखुणा डागडुजी करून जतन करण्याचा प्रयत्न मंदिर ट्रस्ट व स्थानिक भाविकांनी केला आहे. येथे दोन कुंड आहेत. उत्तरेकडील कुंड श्रीरामाच्या बाणाने तयार झाले अशी आख्यायिका रामायण या ग्रंथात आहे.
समाज प्रबोधन व समाजातील माणसाना सन्मार्गाला लावण्यासाठी अगस्ति ऋषींनी खूप परिश्रम घेतले. आदिवासी समाजाला कृषिविद्या शिकविली. “परोपकार करण्यासाठी दक्षिणेला जावे” या गुरु आज्ञेची आपल्या सेवेतून पूर्तता केली. महाराष्ट्रातील अगस्ति ऋषींचे हे एकमेव स्थान आहे. त्यामुळे दूर-दूरचे असंख्य भाविक आवर्जून दर्शनाला या ठिकाणी येत असतात.